नांदेड / माहूर – एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोण उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण राहणार आणि कोण जाणार याकडे केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यातच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत अनेक खासदार उपस्थित राहिले नाहीत. त्यात हिंगोली-नांदेड- यवतमाळ यवतमाळ या तीन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणारे खासदार हेमंत पाटील हेही अनुपस्थित होते.त्यावर खुद्द खासदार हेमंत पाटील यांनी खुलासा केला आहे.कोणत्याही गैरसमज पसरू नका, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचे खा. हेमंत पाटील यांनी सांगितले आहे.त्यामुळे खा. हेमंत पाटील यांच्याबाबतीत सुरू झालेल्या चर्चांवर तूर्तास पडदा पडल्याचे दिसत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यापासून एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचे पडसाद जाणून घेण्याचे या बैठकीच्या मागचे नियोजन होते.या बैठकीला शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदार उपस्थित होते तर 7 खासदार अनुपस्थित असल्याचे सांगण्यात येत होते. राज्यसभेवरील तिघांपैकी दोन खासदार हजर होते.शिवसेनेचे 12 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. भावना गवळी, श्रीकांत शिंदे यांची अनुपस्थिती अपेक्षितच होती. मात्र मंडलिक, हेमंत पाटील, संजय जाधव यांच्या गैरहजेरीनं अनेकांना धक्का बसला. उपस्थित लोकसभा खासदारांमधे गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत, विनायक राऊत, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, प्रताप जाधव, सदाशिव लोखंडे, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, राजेंद्र गावित आदींचा समावेश होता.तर अनुपस्थित खासदारांमध्ये यवतमाळ-वाशिम भावना गवळी, – परभणी- संजय जाधव, कोल्हापूर संजय मंडलिक, हिंगोली- नांदेड हेमंत पाटील, कल्याण-डोंबिवली श्रीकांत शिंदे, रामटेक कृपाल – तुमाने, दादरा-नगर हवेली कलाबेन डेलकर आदींचा समावेश होता. संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी हे राज्यसभेचे खासदार उपस्थित होते.अनिल देसाई दिल्ली येथे असल्यामुळे ते गैरहजर होते.
मुंबईत जाऊन थेट ‘मातोश्री’त
मुंबईत मातोश्री’वर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे ते एकनाथ शिंदे गटात गेले नाहीत हे स्पष्ट झाले आहे. पण मग ते बैठकीला गैरहजर का राहिले असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर खुद्द खासदार हेमंत पाटील यांनी खुलासा केला आहे.खा.सदार हेमंत पाटील हे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा वर्षांपासून आषाढी महोत्सव हा कार्यक्रम घेत असतात. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे नांदेडकरांना हा महोत्सव पुन्हा अनुभवता येणार की नाही अशी शंका वाटत होती. मात्र कोरोनामुळे रद्द करावा लागलेला हा कार्यक्रम पुन्हा सुरू करून खासदार हेमंत पाटील यांनी काल रविवारी नांदेडमध्ये हा कार्यक्रम घेतला. रात्री उशीरापर्यंत चाललेला हा कार्यक्रम संपवून ते आज सकाळी पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. याबाबतची कल्पना त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही दिली होती.त्यामुळे खासदारांच्या बैठकीस ते अनुपस्थित राहिले, पण खासदार हेमंत पाटील हे बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे तेही एकनाथ शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू होऊन तशा बातम्याही सर्वत्र सुरू झाल्या. त्यामुळे हेमंत पाटील हे नांदेडहून औरंगाबादला गेले. आजच शरद पवार हेही औरंगाबाद येथून मुंबईकडे निघाले होते. सायंकाळच्या सुमारास हेमंत पाटील हेही खा. शरद पवार यांच्यासह औरंगाबादहून मुंबईला गेले. आणि त्यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे हेमंत पाटील यांच्याबाबतीत सुरू झालेल्या चर्चांवर तूर्तास पडदा पडल्याचे दिसत आहे.
प्रसार माध्यमांना विनंती माझ्या बद्दल कोणत्याही गैरसमज पसरू नका ; खा. हेमंत पाटील यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेष आव्हान.
शिवसेनापक्ष प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शिवसेना खासदारांची आज बैठक बोलावली होती. या बैठकीला मी वेळेत उपस्थितीत राहू शकलो नाही. कारण मी गेल्या 16 वर्षापासून नांदेड मध्ये मा. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी महोत्सवाचे आयोजन करत आहे.रविवारी (ता.10) नांदेडमध्ये आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रात्री उशिरा संपला. त्यामुळे मातोश्रीवर बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीस पोहचण्यास थोडासा वेळ झाला.पण प्रसार माध्यमात उलट सुलट चर्चा झाल्या माझ्या बद्दल अफवा पसरवल्या गेल्या. तरी माध्यमांना माझी विनंती आहे की माझ्या बद्दल कोणत्याही अफवा पसरू नका. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भात पक्ष प्रमुख जो निर्णय देतील तो मला मान्य आहे…!!
असे विशेष आवाहन खा. हेमंत पाटील यांनी केले आहे.